बाबाचा अनुभव मधील एक अतिशय सुंदर लेख –
तरीही एक प्रश्न आहेच. खरोखर लेखनाचा समाजजीवनावर परिणाम होतो का? ‘माणसं’मधल्या लेखांपैकी हमाल, तंबाखू कामगार यांच्यावर परिणाम झालेला दिसतो. पण तो नुसत्या लेखाचा झाला असता का? पुण्यात बाबा आढावांची, निपाणीत सुभाष जोशींची संघटना होती, चळवळ होती म्हणून त्यांनी लेखांचा उपयोग करून चळवळ पुढे नेली. पण ही चळवळ नसती तर? मग जिथे चळवळ नसते तिथे लेखनाचं काय प्रयोजन? लिहिणार्याने आपल्या मर्यादा आणि ताकद लक्षात घ्यायला हवी. लेखन हे दृष्टी देण्याचं काम करतं. काही वेळा प्रत्यक्ष उपयोग दिसत नसला तरी बीजं पेरली जात असतात. ती विखरून पडतात. कुठे तरी रुजतात. नाही तरी वनस्पती एवढ्या बिया जमिनीवर टाकतात, त्यातल्या किती थोड्या रुजतात! बाकीच्या मरतात. पण त्या वाया जातात का? नाही. जमिनीला त्या वेगळ्या प्रकारे समृद्ध करतातच की!
संपुर्ण लेख इथे वाचता येईल – मला (आणि वाचकांनाही) जागं केलेलं पुस्तक – माणसं!
Sundar lekh..
Comment by Vishal kamath — August 3, 2014 @ 4:23 pm |
[…] अनुभव मधील लेख – […]
Pingback by 29th AUGUST 1944 DR. ANIL AVCHAT – BABA – | healmed — August 31, 2015 @ 10:48 am |